ताज्या घडामोडीमुंबई

‘मविआचा पत्त्याचा बंगला कोसळेल’, देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

मुंबई | महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला राज्यसभेच्या निवडणुकीत हलला होता. मात्र, आता येत्या २० तारखेला तो थेट कोसळेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजपच्या आमदारांसमोर केल्याचे समजते.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. त्यांच्यासोबत फडणवीस यांची कुलाब्याच्या ताज प्रेसिडेंड हॉटेलमध्ये बैठक पार पडली. यात मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीबाबत मोठा दावा केल्याचे समजते. ‘राज्यसभेला तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे १० तारखेला महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला होता. मात्र आता २० तारखेला आपले पाचही उमेदवार निवडून आणल्यास तो कोसळणार आहे’, असे ते म्हणाल्याचे समजते. भाजपचे काही आमदार मुंबईत अद्याप पोहोचलेले नसून, त्यांना लवकरात लवकर पोहोचण्याच्या सूचना यावेळी फडणवीस यांनी दिल्या. रविवारी दुपारी ४ वाजता ते पुन्हा आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button