विजय वडेट्टीवारांच्या टीकेला मनोज जरांगेचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले..
मुंबई : पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर मनोज जरांगे हिरो झाले आणि आता ते सरकारला धमक्या देतात, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, त्यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही हिरो झालो नाही. आम्ही स्वतःला हिरो मानतही नाही. म्हणूनच मराठ्यांनी आम्हाला स्वीकारलं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही स्वतःला हिरो मानतही नाही. म्हणूनच मराठ्यांनी आम्हाला स्वीकारलं. त्यांनी त्यांचे शब्द आठवावेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील लोकांनी आम्हाला मोडायचं ठरवलं होतं. विरोधी पक्ष आमच्या बाजूने आवाज उठवत नव्हता. आमच्या आयाबहिणींची डोकी फोडली. त्यामुळे आम्ही हिरो झालो नव्हतो, तर आमचं आंदोलन संपवलं होतं. त्या दोघा-तिघांना आमचं आंदोलन संपवायचं होतं.
हेही वाचा – अनुष्का-विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
हिरोसारखे फालतू शब्द बोलायचे आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. ते त्यांची उभी हयात मराठा समाजात संभ्रम निर्माण करू शकणार नाहीत. ते तर सोडा, त्यांची पुढची पिढीही आता मराठ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू शकणार नाही. कारण मराठा समाज त्या ५-६ जणांना पूर्णपणे ओळखून चुकला आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
विजय वडोट्टीवार नेमकं काय म्हणाले?
गोळीबारानंतर मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे हिरो म्हणून पुढे आले. त्यानंतर त्यांना समाजाचं सगळं पाठबळ मिळालं आणि ‘हम छुका सकते हैं’ असा गर्व झाला. त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात. इतक्या तारखेपर्यंत करा, तितक्या तारखेपर्यंत करा, नाही केलं तर बघून घेऊ. कसे रस्त्यावर फिरतात ते बघू, अशा आम्हाला धमक्या देतात, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.