‘मराठा आरक्षण मिळालं तर आम्हीही अयोध्येत जाणार’; मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil | अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन झालं असून प्रभू श्रीराम आज विराजमान झाले आहेत. देशातील रामभक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही अहमदनगर येथे भगवान श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे. याबाबत त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज भगवान श्रीरामाचं दर्शन घेतलं, आरती केली आणि विधिवत पूजाही केली. आज आमच्या भारतवासियांचा आनंदाचा दिवस आहे. खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान होत आहेत. हा आनंदाचा दिवस आम्ही अहमदनगर येथे साजरा केला.
हेही वाचा – राम मंदिराच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदी भावूक; म्हणाले, “मी प्रभू रामाची माफी मागतो..”
भाजपा असो वा काँग्रेस असो. हा भारतवासियांचा आनंदाचा क्षण आहे. खूर दशकानंतर ही प्रतिक्षा आज संपली. आनंदाचा दिवस आज उगवला आहे. हिंदू धर्माचा हा गर्व आणि स्वाभिमान आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी भगवान श्रीरामाकडे साकडं घातले का? असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, भगवान श्रीराम आज अयोध्येत विराजमान झाले आहेत. आज आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे उद्या त्यांच्याकडे साकडं घालू. उद्या वेगळं साकडं घालतो. आज फक्त आनंदच व्यक्त केला. तसेच, मराठा आरक्षण मिळालं तर आम्हीही अयोध्येत जाणार. रेल्वे भरून घेऊन जाणार, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.