‘मावळातील सर्व मर्द मावळ्यांनी २६ जानेवारीला मुंबईत यावं’; पहाटे चार वाजता मनोज जरांगेंचं भाषण
पिंपरी | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा सुरू आहे. काल त्याचा पाचवा दिवस हा पुणे शहरात तर सहाव्या दिवसाची सुरूवात पिंपरी-चिंचवड शहरात गेली. डांगे चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पहाटे चारच्या सुमारास आगमन झाले. यावेळी मनोज जरांगे यांनी सर्व मराठ्यांनी २६ जानेवारीला मुंबईत यावं असं आवाहन केलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सलग दोन दिवस बोलत असल्याने माझा आवाज कमी झाला आहे. माझा आवाज पण निघत नाही. तुम्हाला विनंती आहे की, आपल्या लेकरांसाठी हा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष शेवटच्या टप्प्यात आला आहे. मावळातील सर्व मर्द मावळ्यांनी २६ जानेवारीला मुंबईत यावं. आरक्षणाची शर्यत जिंकायची आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षण मोर्चा रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली सुरु
#पुणे #पिंपरीचिंचवड
हजारो लोकांनी पहाटे साडेतीनला #मनोजजरांगेपाटील यांचे फुलांची उधळण करत डांगे चौकात केले स्वागत.
इथे लोक १५ तासापेक्षा जास्त अधिक काळापासून वाट पाहत होते.
औंध ते डांगे चौक अंतर कापण्यासाठी ६ तास लागले.#pune#punenews#MarathaReservation #MarathaAandolan pic.twitter.com/dmTnR0Q7ht— Brijmohan Patil (@brizpatil) January 24, 2024
महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी लढतो आहोत. आपण सर्व जण एकत्र लढू, समाजाला पाठबळ देण्याची हीच वेळ आहे. तुम्ही सर्व मुंबईला या, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे. यानंतर जरांगे यांची लोणावळ्यात जाहीर सभा होणार आहे.