#mankibat: देशाच्या पूर्वभागात वादळामुळे नुकसान तर अन्य भागांमध्ये टोळधाड चिंताजनक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
कोरोनामुळे स्थलांतरित होणाऱ्या आपल्या मजुरांच्या वेदनेत आपण देशाच्या पूर्वेकडील भागातील वेदना पाहू शकतो. देशाच्या वाढीचे इंजिन होण्याची क्षमता असणारा हा प्रदेश, ज्याची कार्यक्षमता देशाला अधिक उंचावर नेण्याची क्षमता आणि सामर्थ्य आहे, असे मतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
‘#मनकीबात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. भारताच्या पूर्वेकडील भागात चक्रीवादळामुळे होणार्या नैसर्गिक आपत्तीचा सामना केला जात आहे, तर देशातील बर्याच भागांवर टोळ किड्यांची धाड सुरू आहे. या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होऊ शकते याची आठवण करून दिली आहे. टोळांचा हल्ला बर्याच दिवसांपर्यंत चालतो. त्यामुळे मोठ्या भूभागावरील शेतीचे नुकसान झाले आहे.
तसेच, काही दिवसांपूर्वी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या एक कोटींहून अधिक झाली आहे. देशातील गरिब नागरिकांनी रुग्णालयात उपचार घेतले, तर त्यांना फी भरण्याची आवश्यकता नाही. सरकारने आयुष्यमान भारत योजनेमध्ये सुमारे १४ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.