Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘असा बंदोबस्त करा की हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडेल’; राज ठाकरे

मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर काल दहशतवादी भ्याड हल्ला केला. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या निरपराध लोकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये अनेक भारतीय नागिरकांता तसेच काही परदेशी पर्यटकांचाही मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 30 पर्यंत पोहोचला आहे. तर अनेक जम गंभीर जखमी असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहलगामधील या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला असून संतापाचं वातावरण आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट करत राज ठाकरेंनी लिहीली आहे. ‘केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा…’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल, असेही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा –  “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांचे पार्थिव आज महाराष्ट्रात आणणार”, उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील.

केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत… केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली… एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला… ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ… या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे…

केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी….

हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये… आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button