लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – मुख्यमंत्री
![Tired of the government's work, the Director General of Police went, Fadnavis's Tikastra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/devendra-fadnavis-6.jpg)
धुळे : मुले पळवण्याच्या संशयावरून धुळ्यात जमावाने पाच जणांची ठेचून हत्या केली. या प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसानभरपाई घोषित केली आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
साक्री तालुक्यामधील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर पाच जणांची हत्या करण्यात आली. मुले पळवणारी टोळी गावात आल्याची अफवा पसरल्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाने हे राक्षसी कृत्य केले. राईनपाडा या आदिवासी गावात काल आठवडे बाजार भरला होता. या बाजारात काहीजण फिरत होते.
यावेळी गावात मुले पळवणारी टोळी आल्याचा संशय काहींना आला. यानंतर तशी अफवा गावात पसरली आणि जमावाने पाच जणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पाचही जणांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे मृतदेह जमावाने ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणून टाकले.