महाराष्ट्रात २२ जिल्हे आणि ४९ नव्या तालुक्यांचा प्रस्ताव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/2-30.jpg)
मुंबई |महाईन्यूज|प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात नव्याने काही जिल्हे आणि तालुका निर्मिती करण्याचा महाविकास आघाडीचा विचार सुरु आहे. त्यानूसार राज्यात नवे २२ जिल्हे आणि ४९ तालुके निर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यात नव्याने संभाव्य कोणते जिल्हे व तालुके निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यात ठाण्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण, पालघरमधून जव्हार, रत्नागिरीतून मानगड, रायगडमधून महाड हे जिल्हे होण्याची शक्यता आहे. अहमदनगरमधून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर, गडचिरोलीतून अहेरी, जळगावातून भुसावळ, लातूरमधून उदगीर, बीडमधून अंबेजोगाई, नांदेडमधून किनवट, साताऱ्यातून माणदेश तर पुण्यातून शिवनेरी हे जिल्हे होण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे.
प्रस्तावित जिल्हे
पालघर – जव्हार
ठाणे – मीरा-भाईंदर आणि कल्याण
रत्नागिरी – मानगड
रायगड – महाड
अहमदनगर – शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर
नाशिक – मालेगाव आणि कळवण
बीड – अंबेजोगाई
नांदेड – किनवट
सातारा- माणदेश
पुणे – शिवनेरी
बुलडाणा – खामगाव
यवतमाळ – पुसद
अमरावती – अचलपूर
भंडारा – साकोली
चंद्रपूर- चिमूर
गडचिरोली- अहेरी
जळगाव- भुसावळ
लातूर – उदगीर