breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी कोकणासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्याची राज्य सरकारची परवानगी

दरवर्षी चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे हे चित्र बदलल आहे. मात्र रेल्वे बंद असल्यामुळे खाजगी वाहनानं गावाला जाणं प्रत्येकाला शक्य नाही. म्हणून विशेष रेल्वे गाड्या सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली होती. अशा परिस्थितीत गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याचं म्हटलं जात आहे.

राज्य सरकारने मध्य रेल्वेला दिलेल्या पत्रात कोकणसाठी विशेष रेल्वेंचे नियोजन करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे मागणीनुसार गाड्या सोडतानाच कन्फर्म तिकीट आणि ई-पास असलेल्यांनाच यातून प्रवासाची मुभा देण्याच्या सूचना आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे प्रवासादरम्यान शारीरीक अंतर राखणे, सॅनिटाईज करणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी अधिक माहिती देऊ अस म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button