breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

राजीव सातव यांच्या रूपाने महाराष्ट्राने उमदे नेतृत्व गमावले : सत्यजित देशमुख

शिराळा | प्रतिनिधी

तरुण , अभ्यासू, सुसंस्कृत ,उमदे नेतृत्त्व राजीवजी सातव यांच्या रूपाने देशाने , महाराष्ट्रने गमावलं, अशा भावना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत.

संसदरत्न , खासदार स्व मा राजीव जी सातव यांनी जिल्हा पातळी वरुन राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगीरीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रिय पातळीवर आपली ओळख निर्माण केली .
स्व. राजीवजी सातव यांच्या बद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. ते एक संसदपटू तर होतेच या शिवाय ते माणुसकी जपणारे नेते होते सातव यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. लोकशाही , धर्मनिरपेक्षता व समतेच्या मुद्यांवर श्रध्दा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक नेता गमावला य कठीण काळात आम्ही सर्वजण स्व राजीवजी सातव यांच्या कुटुंबा समेवत आहोत. त्यांना भावपूर्ण. श्राध्दांजली, अशा भावना सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button