‘महाराष्ट्राला शिवसेना व ठाकरेंशिवाय पर्याय नाही’
ऋतुजा लटकेंचा शिंदे गट-भाजपाला टोला
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ऋतुजा लटकेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल परब हे देखील उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ऋतुजा लटकेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल परब हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “आजच्या दिवसाची सुरुवात मी बाप्पांचे दर्शन घेऊन करत आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारीचा अर्ज भरायचा असल्याने आता मी बीएमसी कार्यालयात राजीमाना स्वीकारल्याचे पत्र घेणार आहे. मला अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत रेकॉर्डब्रेक विजय खेचून आणायचा आहे. त्यासाठी सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही. रमेश लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मालपाडोंगरीतील गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर मी देखील मालपाडोंगरी गणपतीचे दर्शन घेऊनच अर्ज दाखल करणार आहे” ऋतुजा लटकेंनी सांगितलं.
शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटकेंचा राजीनामी अखेर मंजूर करण्यात आला. 12 ऑक्टोबर 2020 रोजी ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही, असे महापालिकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यांचा राजीनामा मंजूर करणार आहात का, ते स्पष्ट करा असे सांगत चांगलेच फटकारले होते.