‘उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांनी एकत्र यावं’; महंत कबीरदास महाराज यांची मागणी
अमरावती : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या पोहरादेवी येथे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा महंत कबीरदास महाराज यांनी केली आहे. त्या दोघांनी मिळून राज्याचा कारभाव करावा, यासाठी मी मुंबई येथे जाणार असल्याचंही ते म्हणाले.
महंत कबीरदास महाराज म्हणाले की, ३ डिसेंबर २०१८ ला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे इथे आले होते. यावेळी प्रचंड असा जनसागर पाहायला मिळाला. ठाकरे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या विकासासाठी काम केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळावी.
हेही वाचा – एकनाथ शिंदे, अजित पवारांनंतर काँग्रेसमधील हा नेता संपर्कात; गिरीश महाजनांचं सूचक विधान
दोन्ही पक्षातील नेते, आमदार, खासदार यांनी त्यांना साथ द्यावी. सध्या जनता राजकारणाला कंटाळली आहे. कोणीतरी दोन पाऊले मागे यावे. अशी माझी इच्छा असून यासाठी मी मुंबई येथे जाऊन मागणी करणार आहे, असंही महंत कबीरसाद महाराज म्हणाले.