ओमानच्या किनाऱ्याजवळ जहाजाचे इंजिन निकामी; १४ भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरूप सुटका

Indian crew rescued Oman : ओमानच्या किनाऱ्याजवळ १४ भारतीयांना घेऊन जाणारी एक बोट अचानक बुडू लागल्याने एक मोठी सागरी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच अमेरिकन नौदल, भारतीय नौदल आणि तेथून जाणारे एक व्यापारी जहाज यांनी संयुक्तपणे बचाव मोहीम राबवली. सर्व १४ भारतीयांना वेळेत एका ‘लाइफ राफ्ट’वर (बचाव नौकेवर) सुरक्षितपणे हलवण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ओमानमधील ‘रास अल हद्द’च्या पूर्वेस सुमारे ८० सागरी मैल अंतरावर घडली. वाढता सागरी तणाव आणि सुरक्षेपुढील आव्हाने यांच्या पार्श्वभूमीवर, या बचाव मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ओमानमधील भारतीय दूतावासने रविवारी सांगितले की, ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘विराट १’ या भारतीय ध्वजधारक यांत्रिक शिडाच्या जहाजाबाबत एक घटना घडल्याचे समोर आले आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सध्या शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. दूतावासाने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वजधारक यांत्रिक शिडाच्या ‘विराट १’ या जहाजाबाबत एक घटना घडल्याचे मिशनला समजले आहे. या जहाजावर १४ भारतीय कर्मचारी असल्याची माहिती आहे. ओमानचे अधिकारी आणि घटनेच्या परिसरातील इतर जहाजांच्या समन्वयाने शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.”
हेही वाचा – ‘प्रत्येक गोष्टीत राजकारण…’ ; जैन मुनींच्या पांढऱ्या पट्टीच्या वादावर CM फडणवीस नेमकं काय म्हणाले?
दूतावासानुसार, ओमानचे अधिकारी तसेच घटनास्थळाच्या जवळून जाणाऱ्या इतर जहाजांच्या मदतीने शोध आणि बचाव मोहिमेचे नियोजन केले जात आहे.कर्मचाऱ्यांशी संपर्क झाला आहे की नाही, किंवा बचाव कार्यात काही यश आले आहे का, याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नाही. शोध मोहीम पुढे सरकल्याने यावर अधिक अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे.
मध्यपूर्वेतील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच ही घटना समोर आली आहे.नुकतेच ओमानच्या डुकम बंदरात (Duqm Port) उभे असलेल्या ‘एमटी सेलेस्टियल’ (MT Celestial) जहाजावर एका भारतीय नागरिकाचा वैद्यकीय कारणांमुळे मृत्यू झाला होता. पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली जात असल्याचे मस्कत येथील भारतीय दूतावासाने सांगितले होते.यापूर्वी, ओमानच्या किनाऱ्याजवळ एका टँकरवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता, ज्यावर नवी दिल्लीने तीव्र राजनैतिक चिंता व्यक्त केली होती.त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या राजदूतांना (Chargé d’affaires) समन्स बजावून “नागरी जहाजांवर घातक आणि प्राणघातक बळाचा वापर केल्याबद्दल” आपली “तीव्र चिंता” व्यक्त केली होती. दरम्यान,’एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, जागतिक शिपिंग फ्लीट्समध्ये ३ लाखांहून अधिक भारतीय खलाशी कार्यरत आहेत, ज्यांपैकी १८,००ाराहून अधिक खलाशी मध्यपूर्वेत काम करतात.





