ताज्या घडामोडी

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यापर्यंत पहलगाम हल्ल्याची संशयाची सूई

पाक लष्कर प्रमुखांची चूक किती महाग पडणार?

पहलगाम : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून ‘कॉपी पेस्ट’ कारवाई करण्यात आली. भारताने सिंधु नदी पाणी वाटप करार रद्द केला तर पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला.

हेही वाचा   :    Pahalgam Terrorist Attack | “मुस्लीम म्हणून लाज वाटतेय”; पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायक संतापला 

दोन्ही देशांचा व्यापारही ठप्प होणार आहे. या हल्ल्याचे परिणाम पाकिस्तानसाठी किती महाग ठरतील, त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारीच स्पष्ट शब्दांमध्ये संकेत दिले. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यापर्यंत पहलगाम हल्ल्याची संशयाची सूई जात आहे. काही दिवसांपूर्वी असीम मुनीर यांनी केलेले वक्तव्य पहलगाम हल्ल्याची तयारीच असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पाकिस्तानला या हल्ल्याची किती मोठी किंमत चुकवावी लागेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button