ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

लई ‘बारा’ चं बारामती, बारामतीच्या करामती !

भारताच्या राजकारणात केव्हा पण राजकीय चर्चा सुरू झाल्या की हमखास विषय निघतो, आणि येऊन थांबतो तो बारामती वर ! या गावानं आणि येथील पवार कुटुंबांनं गेली ५० वर्षे नुसत्या महाराष्ट्रावरच नव्हे, तर संपूर्ण देशावर राजकारणाची छाप पाडली आहे.. सध्या, बघा ना.. लोकसभेचा एक खासदार, राज्यसभेचे दोन खासदार, एक आमदार आणि एक उपमुख्यमंत्री या पवार कुटुंबात !

सध्याचे राजकारणातील खलनायक..

पूर्वी महाराष्ट्रात, या पवार कुटुंबाशिवाय राजकारणाचं पान हलंत नव्हतं..पण, हल्ली काय झालंय..जसजशी राजकारणाची वाळू या पवार कुटुंबाच्या हातातून निसटू लागली आहे, तसतसं त्यांची धोरणं, त्यांची वक्तव्यं भरकटू लागली आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या नजरेत हे पवार कुटुंब राजकारणातील ‘व्हिलन’ म्हणजे खलनायक होत चाललं आहे.

वडाच्या झाडालाच वाळवी..

बारामतीच्या राजकारणाचा भक्कम वड बहरत असताना आणि त्याच्या फांद्या, पारंब्याही खोलपर्यंत जात असताना अचानक दृष्ट लागावी तशी मती फिरली. शरद पवार यांच्या रूपानं खंबीर उभ्या असणाऱ्या वडाच्या झाडाला वाळवी लागली आणि ते पोखरलं जाऊ लागलं.. त्यांच्याच तालमीत तयार झालेले, त्यांनी उपमुख्यमंत्री बनवलेले त्यांचे पुतणे अजित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षाला सुरुंग लावला आणि कट्टर विरोधक असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दावणीला जाऊन उभे राहिले..जाताना पक्षातील ऐंशी टक्के नेते आणि कार्यकर्ते घेऊन गेले तो भाग वेगळा !

दहशतवादी हल्ला आणि वक्तव्यं..

काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी हिंदू पुरुषांना धर्म विचारून दहशतवाद्यांनी अचूक टिपले..जे मारले गेले त्यांच्या पत्नींनी सुद्धा ही व्यथा मांडली.. पण, राजकारणात तोल गेला असल्यामुळं शरद पवार गटाकडून जी वक्तव्यं पुढं आली, ती नक्कीच हिंदूंमध्ये चीड निर्माण करणारी आहेत.

‘नमाजवादी’ राजकारणाचा पिंड..

गेल्या काही दिवसात मतांच्या राजकारणामध्ये मुस्लिमधार्जिणे धोरण स्वीकारता स्वीकारता शरद पवारांचा गट हा देशद्रोही वक्तव्यं करू लागला आहे की काय? अशी शंका येऊ लागली आहे. वक्फ बोर्डाचं सुधारणा विधेयक चर्चेला आलं की सभागृहात त्यांच्या पक्षाच्या खासदारांची दांडी..काश्मीरचं ३७० वं कलम हटवण्याचं विधेयक मंजूर होण्याची वेळ आली की यांच्या खासदारांचा सभात्याग.. हे धोरण आता मतदारांच्या अंगवळणी पडू लागलं आहे!

अनिल देशमुखांचं बरळणं..

पहलगाम हल्ल्यानंतर एकदा का शरद पवार यांनी उलटी म्हणजे हिंदूंच्या विरोधात भूमिका मांडली, की त्यांचे चेलेही त्याच दिशेनं बडबडून लागले. त्यांचे एकेकाळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर अकलेचे तारे तोडले. ज्या परिवारानं मुलगा, बाप, वडील गमावलेत, त्या पीडित कुटुंबाचं म्हणणं खोटं ठरवण्याचा घाट घालणं या नतद्रष्टांनी सुरू केलं. अनिल देशमुख सारखा भ्रष्ट हिंदुद्रोही राजकारणी म्हणतो, की मारण्या अगोदर धर्म विचारला गेला नाही. घटनास्थळी असणाऱ्या ज्या परिवारानं आपल्या घरातला माणूस गमावला,ते म्हणतात, की धर्म ‘कन्फर्म’ करून गोळ्या घातल्यात, आणि यांचं म्हणणं वेगळंच!

राजकारणासाठी कोणत्या थराला?

फक्त मताच्या राजकारणासाठी शरद पवार गट कोणत्याही थराला जाऊ शकतो, दहशतवाद्यांची बाजू घेऊ शकतो! कारण काय तर यांना एकगठ्ठा मत पाहिजेत..मुस्लिमांची मनं दुखावली जाऊ नयेत, म्हणून चढाओढ लागलीय, एकीकडं उद्धव ठाकरे गटाचे विश्वप्रवक्ते संजय राऊत तर दुसरीकडं अनिल देशमुख..जाणून बुजून दहशतवाद्यांची बाजू घेऊन शरद पवार गट आणि उबाठाची शिल्लक सेना काय साध्य करत आहे, याचे मनन करा, पुढील निवडणुकीत यांना धडा शिकवा !

हेही वाचा –  अखेर पुणे शहरात पाणीकपात: कात्रज, कोंढवा, सिंहगड रस्ता भागात कपात

नीच मनोवृत्ती दुसरं काय?

दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पहलगाममध्ये शरद पवार, संजय राऊत, अनिल देशमुख, अमोल कोल्हे, अखिलेश यादव यांच्या परिवारातील कोणीही असते, तर समजलं असतं, दहशतवादी हल्ला कशाला म्हणतात ते ! आणि दहशतवादी काय पाहून मारतात ते ! नीच मनोवृत्ती दुसरं काय? पक्ष संपून आता गटाच्या स्वरूपात शिल्लक राहिलेले शरद पवार गट आणि उबाठा गट महाराष्ट्रद्रोही, हिंदूद्रोही तर होतेच, आज देशद्रोही बनले आहेत.

अमोल कोल्हेची कोल्हेकुई..

पैशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या भूमिका करायच्या आणि वास्तवात औरंजेबाच्या विचारावर चालायचं, हाच अमोल कोल्हेचा धंदा आहे. दहशतवादी आणि शरद पवार गटाची भूमिका एक सारखीच हिंदुद्रोही आणि देशद्रोही आहे. निरापराध हिंदू मारले गेले, त्याचे यांना सोयर-सुतक नाही, यांचा जीव फक्त मुस्लिम वोट बँकेवर आहे, त्यासाठी ते दहशतवाद्यांचीही बाजू घेऊ शकतात. अगोदर शरद पवार नंतर सुप्रिया सुळे, अनिल देशमुख आणि आता लबाड कोल्हा दहशतवाद्यांची बाजू घेण्यासाठी पुढं सरसावला आहे. हा कोल्हा जर त्या दहशतवादी हल्ल्यात सापडला असता तर याला कळलं असतं दहशतवादी प्रथम उघडं करून आणि नंतर काय बघून मारतात ते !

औरंगाबाद नावाला विरोध..

शरद पवार पक्षाचा ‘स्टॅन्ड’ साफ आहे, शरद पवार गट दहशतवाद्यासोबत आहे. त्यांना दहशतवादी विचारांची एकगठ्ठा मतं हवी आहेत. दहशतवाद्यांकडून मारल्या जाणाऱ्या हिंदूंची किंमत नाही. मराठ्यांची मतं घ्यायची आणि छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करायचा, हे शरद पवार पक्षाचं धोरण जुनंच आहे. विखूरलेला हिंदू आपलं काही करू शकत नाही. म्हणून हिंदूंची बाजू शरद पवार कधीच घेणार नाहीत, पण एकगठ्ठा मिळणारी जिहादी मतं शरद पवारांसाठी महत्वाची आहेत.

औरंग्या फॅन क्लबच्या अध्यक्षा..

आता प्रश्न राहतो तो सुप्रिया सुळे यांचा..त्यांना स्वतःची भूमिका नसते.. रोज पत्रकार परिषदा झोडून प्रसिद्धी मिळवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना देश प्रेम, हिंदू प्रेम याच्याशी काय असणार ? वडिलांची पुण्याई आणि राजकारणातले डावपेच याच्या जीवावर खासदार होणाऱ्या सुप्रिया ताईंचे लक्ष फक्त ‘सर्वोत्तम संसदपटू’ म्हणून गौरव करून घ्यायचा आणि मिरवायचं एवढाच आहे. औरंग्या फॅन क्लबच्या तहहयात अध्यक्षा हे पद सुप्रियाताईंना लागू पडतं, हे कुणीही मान्य करेल. बारामतीच्या या खालच्या थराच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. त्यातून अजित पवार हळूच सटकले असून रोहित पवार यांना कधी शहाणपण येणार, देव जाणे !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button