Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: भारताची स्थिती चांगली: आयसीएमआर

भारतात करोनाच्या महासाथीने अजून तरी शिखर गाठलेले नाही. अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) निवेदिता गुप्ता यांनी सांगितले. देशभरात प्रतिबंधात्मक उपाय केल्यामुळे तसेच, मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश आले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र, देशात समूह संसर्ग झाला असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने समूह संसर्ग हा शब्दप्रयोग करणे टाळले आहे. केंद्र सरकारनेही समूह संसर्ग झाल्याचे नाकारले आहे. समूह संसर्ग हा शब्द वापरण्यापेक्षा करोनाचा प्रादुर्भाव किती झाला आहे हे पाहणे अधिक गरजेचे आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरलेले आहेत. मृत्यूदर कमी करण्यातही भारताला यश आले आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button