शेतकऱ्यांना दिलासा, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली
![सोलापुरात जानेवारीत कांद्याची उच्चांकी आवक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/KANDA-6.jpg)
नवी दिल्ली – देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र आता केंद्राने मोठा निर्णयात कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
1 जानेवारी 2021 पासून कांदा निर्यातीवरील बंदी हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नव्या वर्षापासून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी रद्द करण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या परदेश व्यापारी महासंचालकांनी याबाबतची अधिसूचना सोमवारी जारी केली.
वाचा :-भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची एन्ट्री, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित
सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यासोबतच कांदा साठवणुकीबाबत देखील काही अटी घातल्या होत्या. 14 सप्टेंबरला कांद्यावर निर्यातबंदी घातली होती. त्यानंतर परदेशातूनही मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यात आला होता.
पुरेसा कांदा बाजारात आला असून, त्याचे भावही खाली आहेत. केंद्राने कांद्यावरी निर्यात बंदी हटवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.