breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : राज्यात पावसाठा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नादीने आज पहाटे इशारा पातळी ओलांडली आहे. आता धोका पातळीकडे हळूहळू सरकत आहे, त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे सावट असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. काल सायंकाळी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत होती. पहाटे तीन वाजताच्या सुमारास ३९ फूट ही इशारा पातळी पंचगंगेनं गाठली. त्यामुळे प्रशासनाने पुराचे सावट असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – ‘मणिपूरच्या घटनेतील दोषींना फाशी द्या’; अण्णा हजारेंची मागणी 

कोल्हापूर जिल्ह्यात पुराचे पाणी आल्यामुळे अनेक रस्ते बंद केले आहेत. शिवाजी पूल-गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुतारवाडा, उलपे मळा, कसबा बावडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button