breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘जगाल तर जेवाल’; लाॅकडाऊन वाढवण्याबाबत जितेंद्र आव्हाडांची रोखठोक भूमिका

मुंबई – राज्यात लाॅकडाऊन लावण्यासाठी उशीर झाला, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह मधून सांगितलं होतं. व्यापाऱ्यांच्या दबावामुळे आणि विरोधीपक्षानं केलेल्या जोरदार विरोधामुळे राज्यात थेट लाॅकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नाही. त्याऐवजी त्यांनी कडक निर्बंध लावल्याचं सांगितलं. मात्र, लवकरच राज्यातील या निर्बंधांची मुदत संपणार आहे. यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी “जगात तर जेवाल”, असं म्हणतं थेट निर्बंध वाढवण्याची भूमिका घेतली आहे.

राज्यात लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. महाराष्ट्र आणि मुंबईची काही दिवसांपूर्वीची रुग्ण संख्या पाहा आणि आताची पहा ती नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय. पहिला विषाणू हा आताच्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. माणसाच्या शरीरातला खूप ऑक्सिजन तो खात आहे. त्यामुळे आपल्याला खूप ऑक्सिजनची गरज भासणार आहे. यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात आता प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे असाच कोरोना वाढला तर तिथल्या यंत्रणेवर ताण पडून ती कोलमडू शकते. प्रत्येक कुटुंबातील किंवा ओळखीतल एक जण तरी गेलं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात आता प्रादुर्भाव वाढतोय. तिथल्या यंत्रणेवर ताण पडून ती कोलमडू शकते. प्रत्येक कुटुंबातील किंवा ओळखीतलं एक जण तरी गेलं आहे. माझे एका शब्दात उत्तर आहे, जगाल तर जेवाल. जगला नाहीत तर जेवणार कुठून? सर सलामत तो पगडी पचास, असं देखील आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यात 15 मे पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहणार आहेत. या निर्णयाची घोषणा 30 एप्रिल रोजी केली जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button