महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार; हवामान विभागाची माहिती
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक भागात तापमानात घट झाली आहे. महाराष्ट्रातही काही भागात थंडी जाणवू लागली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे सांगितले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रबी समुद्रात तेज चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात हमून चक्रीवादळ तयार झाले आहे. २०१८ नंतर प्रथमच एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. हवामान खाते यावर लक्ष ठेवून आहे.
हेही वाचा – भारतीय संघाच्या फलंदाजीवर शोएब अख्तरचे सूचक विधान; म्हणाला..
अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर आणि गुजरातवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. गुजरातमध्ये आगामी पाच ते सहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे तर महाराष्ट्रात देखील या चक्रीवादळाचा कोणताच परिणाम होणार नसल्याचेही हवामान विभागाने सांगितलं आहे.