breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

आशिया चषकाच्या फायनलमध्ये पुन्हा IND vs PAK आमनेसामने?

IND vs PAK : भारताने श्रीलंकेविरूद्धच्या समान्यात ४१ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १७ सप्टेंबर २०२३ ला आशिया कपची फायनल होणार आहे. बांगलादेश आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे, भारताच्या विरुद्ध अंतिम फेरीत पाकिस्तान की श्रीलंका खेळणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

अंतिम सुपर ४ सामन्यात श्रीलंकेची पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. या सेमीफायनलचा विजेता रविवारी आशिया कप फायनलमध्ये भारताविरूद्ध खेळणार आहे. त्यामुळे पाकिस्तान विरूद्ध भारत असा फायनल सामना होऊ शकतो? सेमीफायनल वॉशआउट झाल्यास, ज्या संघाचा निव्वळ रनरेट चांगला असेल तो भारत आशिया कप फायनलमध्ये सामील होईल.

हेही वाचा – संसदेच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलला, शर्टवर ‘कमळा’ची फुलं

श्रीलंकेसाठी पाऊस वरदान ठरू शकतो. उत्तम नेट-रन-रेट असल्याने श्रीलंका आता पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. मात्र समजा सामना झाला आणि बाबरच्या संघाने श्रीलंकेचा पराभव केला तर मात्र १७ सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button