ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातल्या आणखी एका जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी लागू

गडचिरोली | राज्यात सध्या अनेक मुद्द्यांवरून वातावरण तापलं आहे. अशात दिनांक १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिन आणि दिनांक ३ मे २०२२ रोजी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणूक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १० मे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) लागू करण्यात आले आहे.

यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे आणि अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून १० मे पर्यंत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे.

शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button