breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

‘माझे तिकीट जरी कापले असले तरी मी फॉर्म भरणार’; भावना गवळी

मुंबई : या निवडणुकीतून भावना गवळी या माघार घेणार नसून त्यांना तिकिटासाठी जरी ‘वंचित’ ठेवले तरी त्या दमदार उमेदवार म्हणून समोर येतील आणि यवतमाळ-वाशीममध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – ‘ठाकरे पिता-पुत्र तुरुंगात जातील, माझ्याकडे…’; नारायण राणे यांचा दावा

याबाबतची सविस्तर बातमी अशी की, भावना गवळी ह्या काही दिवसांपासून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळावे म्हणून मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. त्या गेल्या ५ टर्मपासून त्या ह्या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत . त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती पण त्या भेटीतून त्यांना उमेदवारी मिळणेबाबत काही निश्चित झाले नाही. त्यामुळे भावना गवळी आता अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही असे राजकीय गोटातून माहिती मिळत आहे.

भावना गवळी यांनी जर अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यास राजश्री पाटील  यांच्यासमोर तगडे आव्हान उभा राहू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button