breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

केरळमध्ये अतिवृष्‍टी, जनजीवन विस्‍कळीत

तिरुअनंतपुरम : केरळमध्‍ये मान्‍सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी अतिवृष्‍टी झाल्‍याने येथील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. या अतिवृष्‍टीमुळे पुराचे पाणी घुसल्‍याने अनेक घरांचे नुकसान झाले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच सततच्या मुसळधार पावसामुळे रेल्वे उशिराने धावत आहेत.

मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

हेही वाचा – ‘पॅरा ऑलिम्पिकचे ‘सुवर्णपदक’ आता दृष्टीक्षेपात’; सचिन खिलारी

त्यानंतर आता केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. तसेच केरळमधील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दक्षिण केरळवरील चक्रीवादळाच्या प्रभावाखाली केरळच्या किनारपट्टीपासून दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आयएमडीने पुढील दोन दिवस केरळमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. केरळच्या अनेक भागात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली.

मान्सूनला अजून एक आठवडा बाकी आहे. मात्र, त्याआधीच केरळच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एर्नाकुलम आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातले आहे. केरळच्या इतर आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button