Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ
राज्यात मुसळधार पाऊस सुरू : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा
रत्नागिरी : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आधीच वाहनांचा वेग कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती हाती येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाट बंद असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. सततच्या पावसामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.