Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

राज्यात मुसळधार पाऊस सुरू : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

रत्नागिरी : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आधीच वाहनांचा वेग कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती हाती येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाट बंद असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. सततच्या पावसामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने नऊ जुलैपर्यंत परशुराम घाट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना मोठा वळसा घालून जावं लागत आहे. यामुळे हावेवरदेखील अवजड वाहनांच्या कित्येक किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या आहे. हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस मार्गे सुरू असून परशुराम घाट बंद असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button