लग्नात चांगल्या भेटवस्तू दिल्या नाहीत म्हणून विवाहितेचा छळ : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पिंपरी l प्रतिनिधी
लग्नात चांगल्या भेटवस्तू दिल्या नाहीत या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. सासरच्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना 15 डिसेंबर 2018 ते 5 मार्च 2022 या कालावधीत खराबवाडी येथे घडली.
शुक्लोधन राहुल धुळे आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस्विनी शुक्लोधन धुळे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मयत मुलीला स्वयंपाक येत नाही. घरातील कामे व्यवस्थित येत नाहीत. तसेच तिला लग्नात चांगल्या भेटवस्तू दिल्या नाहीत. आईबापाने लग्नात काहीच दिले नाही अशा कारणावरुन सारखे टोचून बोलून मानसिक त्रास दिला. तिचा अपमान केला. या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.