आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवी सांगवी येथे साथीच्या आजाराची भीती

– पंक्‍चर झालेल्या टायरमध्ये साठतेय पावसाचे पाणी

पिंपरी : प्रतिनिधी

नवी सांगवी येथील पंक्चर काढणारे व्यवसायिक रत्यावरच टायर ठेवत आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. परिणामी परिसरात डासांची उत्त्पती होऊन साथीचे आजार पसरण्याची भिती नागरिकांना आहे. त्यामुळे रचलेले हे टायर काढावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.शहरात अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचा शहरातील नागरिकांना त्रास होत आहे. शहरात डेंग्यू, चिकूनगुनिया, मलेरिया अशा विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त असताना पंक्‍चर काढणार्‍या व्यावसायिकांमुळे त्यामध्ये भर पडत आहे. रस्त्याच्या बाजुला हे व्यावसायिक टायर रचून ठेवत आहेत. सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे या टायरमध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. हे पाणी त्वरीत काढून घ्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मात्र त्याकडे अधिकारी देखील दुर्लक्ष करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button