TOP NewsUncategorizedराष्ट्रिय

#Farmers Protest: तारीख़ पे तारीख़ देना स्ट्रैटेजी है उनकी…; राहुल गांधीची शायरीतून टीका

केंद्र सरकारच्या तीन कृषी विषयक कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यातील आठव्या चर्चेतही दोन्ही बाजू आपापल्या पुर्वीच्याच भूमिकांवर ठाम राहिल्याने कोणताच तोडगा निघू शकला नाही. चर्चेची पुढील फेरी आता 15 जानेवारीला होण्याची शक्‍यता आहे.

चर्चेची 8वी फेरीही ‘निष्फळ’ ठरल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ट्विट करत टीका केली आहे. राहुल गांधीनी म्हटले आहे की, केंद्र सरकारची नीयत साफ नसल्यामुळेच तीन कृषी विषयक कायद्यांसंबंधात अजूनही तोडगा निघाला नाही. तारखेंवर-तारीख देणे हीच केंद्र सरकारची रणनीती आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ‘ नीयत साफ़ नहीं है जिनकी, तारीख़ पे तारीख़ देना स्ट्रैटेजी है उनकी’ असे ट्विट करत केंद्र सरकारवर निशाना साधत आपला संताप व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button