आळंदीत येणाऱ्या वाहनांना ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान प्रवेश बंदी!
पिंपरी : कार्तिकी एकादशी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा उत्सव यावर्षी ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने लाखो भाविक आळंदीत आगमन करत असतात.
९ डिसेंबर कार्तिकी एकादशी आहे, तर ११ डिसेंबरला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आहे. त्या पार्श्वभूमीवर या कालावधीत वारकरी, दिंडीकऱ्यांची वाहने, अत्यावश्यक वाहने वगळता इतर वाहनांना आळंदीत प्रवेश बंदी करण्यात आली.
हेही वाचा – भारतीय नौदल दिन ४ डिसेंबरलाच का साजरा केला जातो? वाचा सविस्तर..
आळंदीकडे येणाऱ्या ७ मार्गावर बॅरिकेट नाकाबंदी करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या वाहनांसाठी प्रशासनाकडून ६ ठिकाणी फोर व्हीलर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी वारी दरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे उप आयुक्त बापू बांगर यांनी केले आहे.