गणपतीच्या दोन लग्नांची आख्यायिका तुम्हाला माहीत आहे का?
Ganesh Utsav 2023 : एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे, कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मुषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी-देवता खूप अस्वस्थ होऊ लागले.
एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मदेवांकडे गेले. देवी-देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान, कोणत्याही लग्नाची बातमी आली की, रिद्धी-सिद्धी भगवान गणेश आणि मुषक राज या दोघांचे लक्ष वळवायच्या, त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली.
हेही वाचा – मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी-सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी-सिद्धीला शाप देणार होतेच, तेव्हा ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी-सिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार, भगवान गणेशाने रिद्धी-सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोन विवाह झाले.