‘दारू व चहा पिऊ नका कारण..’ केंद्र सरकारकडून अलर्ट जारी
दिल्ली : मान्सून देशात दाखल होण्यासाठी जवळपास एक आठवडा उशिर झाला असून लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात हा पारा वाढलेला असून हवेतील आद्रताही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. घामाघूम होत असलेले लोक एसी, पंखे, कुलर जास्त प्रमाणावर वापरत असून विजेच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. अशातच वाढत्या तापमानाचा अंदाज घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तापमानात वाढ होत असताना नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.
‘बिट द हीट’ या अंतर्गत ट्विटरवरून काही टिप्स शेअर करण्यात आल्या आहेत. उन्हामुळे होणाऱ्या आजारापासून वाचण्यासाठी आहार घेताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दारू, चहा, कॉफी आणि शीतपेय यांचे सेवन करणे काही दिवस टाळा, तसेच खूप जास्त प्रोटीन फूड आणि शिळे अन्न टाळा असा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा – पॉर्नस्टार मिया खलिफाची ‘Bigg Boss OTT2’ मध्ये एन्ट्री?
अशी घ्या काळजी
- उन्हाची अधिक तीव्रता असताना स्वयंपाक बनवू नये.
- स्वयंपाक बनवताना खिडक्या आणि दारे कायम उघडी ठेवावीत.
- जास्त प्रमाणात प्रोटीन असलेले पदर्थ खाऊ नयेत. तसेच शिळे अन्न खाणे टाळावे.
- मद्यपान, चहा, कॉफी ही पेय उन्हाळ्यात पिणे टाळावे.