breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

..तर शाळा-कॉलेजची मान्यता रद्द होणार; विभागीय शिक्षण मंडळाचा थेट इशारा

पुणे | शिक्षण विभागातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्य मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाच्या उत्तर पत्रिका न तपासता परत केल्यास संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची मंडळ मान्यता रद्द करण्यात येईल असा कडक इशारा विभागीय मंडळाच्या अध्यक्षांनी दिला आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू आहे तर १ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत करावी अन्यथा मंडळाकडून संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा      –      ‘शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या २ आमदारांना मारहाण करण्यात आली’; अ‍ॅड.असीम सरोदेंचा गंभीर आरोप

उत्तरपत्रिका तपासणी करण्यावर शिक्षकांचा बहिष्कार!

पेन्शन, वेतन, पदभरती या विविध मागण्यांकरिता राज्यातील शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. शिक्षकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी यापूर्वीही आंदोलनं केली आहेत. तरी देखील शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. वारंवार आंदोलने करून केवळ आश्वासन मिळतात म्हणून शिक्षकांनी उत्तरपत्रिका न तपासण्याचा निर्णय घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button