अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
पुणे : वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती पहाटेपासूनच भाविकांची लांबच्या लांब रांग लागली होती.
अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती पहाटे चार ते सहा या वेळात पंडित जितेंद्र अभ्यंकर आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा बापाच्या चरणी सादर केली त्यांच्यासह भाग्यश्री अभ्यंकर तनवी अभ्यंकर यांनी गायन केलं, तर केदार परांजपे, निलेश देशपांडे,अपूर्व द्रविड आणि विशाल गंड्रतवार यांनी साथ संगत केली. रवींद्र खरे यांनी निवेदन केलं. संकष्टी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषत महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत कोणिही करू शकते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृती चतुर्थी. या व्रतात दिवसभर उपवास करावा. उपवासानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे.