उन्हाळ्यात या पिकांची लागवड करा आणि चांगले पैसे कमवा!
![Cultivate these crops in summer and earn good money](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Plant-Crops-In-Summer-780x470.jpg)
Plant Crops In Summer l भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील बहुतांश लोकसंख्या आजही उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत. कमी वेळात जास्त पीक घेण्याचा शेतकरी बांधवांचा सतत प्रयत्न असतो. त्यामुळे नफाही जास्त असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकर पक्व होणारी पिके घेण्यास प्राधान्य द्यावे. तर आज आपण हे जाणून घेणार आहोत की, सर्वात वेगाने वाढणारे पीक कोणते आहे. अल्पावधीत चांगला नफा मिळविण्यासाठी कोणते पीक घेतले पाहिजे.
उन्हाळ्यात या पिकांची लागवड करा!
मुळा : मुळा या पिकाचे उत्पन्न वर्षभर घेता येत असते. तसेच हे पीक लवकर येणारे पीक आहे. पेरणीनंतर अवघ्या ५० दिवसांनी मुळा बाजारात विक्रीसाठी तयार असतो. त्याची पाने हिरव्या भाज्या बनवण्यासाठी देखील वापरतात आणि त्याची मुळे म्हणजे कंद भाजी बनवण्यासाठी आणि कोशिंबीर किंवा रायता बनवण्यासाठी वापरतात. त्यामुळे कमी वेळात जास्त उत्पन्न घेण्यासाठ शेतकरी वर्ग मुळा पिकाचे उत्पन्न घेऊ शकतात.
खरबुज : खरबुजाचे पीक वर्षातून एकदाच आणि उन्हाळ्यात घेतले जाते. याची चव खूप चवदार आणि आरोग्यदायी देखील आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे त्याची सिंचनाची गरज खूप कमी आहे. खरबूज ही उष्ण आणि कोरड्या हवामानातील वनस्पती आहे. पेरणी आणि सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत सर्वोत्तम तापमान २०-२४ अंश सेल्सिअस असते आणि मुळांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी ३०-३५ अंश सेल्सिअस सर्वोत्तम असते. वाळवंटी प्रदेशात जेथे तापमान ४२-४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेथे चांगल्या दर्जाच्या खरबूजाचे उत्पादन करणे शक्य आहे.
हेही वाचा – जय शाह यांची मोठी घोषणा, खेळाडूंना मिळणार ४५ लाखांपर्यत मानधन
काकडी : काकडी हे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात घेतले जाणारे पीक आहे. हे सर्वात वेगाने वाढणारे पीक देखील आहे. ते तीव्र थंडी सहन करण्यास सक्षम नाही, म्हणून उन्हाळ्यात ते वाढण्यास योग्य आहे. कमी वेळात जास्त उत्पादन देणारे हे पीक आहे. काकडीची पेरणी फेब्रुवारी-मार्च महिन्यात केली जाते. काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानात घेतले जाणारे पीक आहे. पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी योग्य आहे. ज्या पिकांमध्ये जोखीम कमी आणि नफा जास्त, अशी पिके घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे.
कोथिंबीर : पेरणीच्या ५० दिवसांनंतर कोथिंबीर बाजारात विक्रीसाठी तयार होते. कोथिंबीर शेतात तसेच घरच्या कुंडीत पिकवता येते. कोथिंबिरीला रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव कमी असतोच, शिवाय त्याला खूप कमी सिंचनाची गरज असते. उन्हाळा आणि पावसाळ्यात याची लागवड केली जाते. कोथिंबीर लागवडीसाठी योग्य निचरा असलेली जमीन सर्वोत्तम मानली जाते. शेतकऱ्यांनी वालुकामय जमिनीत त्याची लागवड केल्यास त्यांना भरपूर फायदा मिळू शकतो. शेतकरी बांधवांनी जास्त पाणी असलेल्या ठिकाणी काळी माती निवडावी. कोथिंबीर लागवडीसाठी जमिनीचा pH आहे मूल्य ६.५ ते ७.५ दरम्यान असणे आवश्यक आहे.
पालक : उन्हाळ्यात कमी कालावधीत आणि कमी पाण्यावर येणार पीक म्हणजे पालक. पालक पेरणीनंतर ५० दिवसांनी काढणीसाठी तयार होते. तसेच हे पीक वर्षभर घेतले जाणारे पीक आहे. पालक लागवडीसाठी सर्वोत्तम महिना मार्च आहे. योग्य वातावरणात पालकाची वर्षभर पेरणी करता येते. पालक पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी, जून-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरणी करता येते, त्यामुळे पालकाचे चांगले उत्पादन मिळते.