breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: “भारताने वेळेत लॉकडाउन जाहीर केला नसता तर कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांहून अधिक असती”
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत जाहीर केलेला लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवला आहे. मात्र अद्यापही करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील रुग्णसंख्या २३,४५२ झाली आहे. पण जर भारताने वेळेत लॉकडाउन जाहीर केला नसता तर रुग्णांच्या संख्या एक लाखांहून अधिक असती अशी माहिती उच्चाधिकार गट-क्रमांक (१)चे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.