breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशभरातील कोरोना बळींची संख्या २१
करोना विषाणूची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या शनिवारी ९३३ झाली. आतापर्यंत यापैकी २१ जणांचा मृत्यू ओढवला आहे. केरळमध्ये या विषाणूचा पहिला बळी शनिवारी नोंदविला गेला. गुजरातेत करोनामुळे एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला असून गुजरातमधील बळींची संख्या चार झाली आहे.
भारतात शनिवापर्यंत करोनाच्या ९३३ रुग्णांची नोंद झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. यापैकी ८३३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तर ७९ रुग्ण हे पूर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. देशभरातील करोना बळींची संख्या आता २१ झाली आहे.