breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: कोरोनामुळे आर्थिक संकट, रघुराम राजन म्हणतात मी सरकारला मदत करायला तयार !

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर केलं. यानंतरही देशातली परिस्थिती लक्षात घेता काही राज्यांमध्ये हे लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. मात्र या लॉकडाउनचा भारतीय अर्थव्यस्थेवर मोठा परिणाम होत आहे. अनेक कंपन्या या काळात बंद असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतोय. याचसोबतच लॉकडाउनमुळे अनेक छोटे उद्योगधंदे, शेतकरी यांच्यावरही परिणाम होत आहे. अशा खडतर परिस्थितीत सरकारने विचारल्यास आपण मदत करायला तयार असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“सध्याच्या घडीला संपूर्ण जग हे आर्थिक मंदीच्या दिशेने झुकत चाललेलं आहे. पुढील वर्षात मला आशा आहे की ही परिस्थिती सुधारलेली असेल. मात्र सध्या करोनाविरुद्ध लढण्यासाठी आपण काय पावलं उचलत आहोत, त्यावर हे अवलंबून असणार आहे. भारतासाठी परकीय चलन हा नेहमी चिंतेचा विषय राहिलेला आहे. सध्या इतर विनकसनशील देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती ही चांगली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण हा देखील एक चिंतेचा विषय आहेच, मात्र ब्राझील सारख्या देशात सध्याची असलेली परिस्थिती पाहता भारतामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला हवा मग ते विरोधी पक्षातलेही का असेना…” रघुराम राजन भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत होते. याचसोबत सध्याच्या परिस्थितीत सरकारने आपल्याला मदत मागितली तर आपण तयार असल्याचंही राजन यांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button