breaking-newsमहाराष्ट्र
#CoronaVirus:राज्यात गेल्या २४ तासात ३७२१ रुग्णांची वाढ
मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात ३७२१ रुग्णांची वाढ झाली असून ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १९६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत ६७,७०६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४९.८६ टक्के झाले आहे. तर मृत्यूदर ४.६३ टक्के झाला आहे.
राज्यात सध्या ६,०१,१८२ जण होम क्वांरटाईन असून २६,९१० लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या ६१,७९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ७,८७,४१९ नमुन्यांपैकी १,३५,७९६ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज राज्यात नोंदवण्यात आलेल्या एकूण ११३ मृत्यूंपैकी ६२ मृत्यू हे मागील ४८ तासातील असून ५१ मृत्यू हे आधीच्या काळातील आहेत. जे दैनंदिन स्वरुपात न दाखवता एकूण आकडेवारीत दाखवण्यात आले आहेत.