breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
कोरोनाने अख्खं कुटुंब संपवलं! १५ दिवसांत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
पुणे – कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रासाठी अत्यंत भयावह ठरत आहे. या लाटेत अनेकांना बाधा होत असून अधिकांचा जीवही गेला आहे. पुण्यातीलएका कुटुंबातील सर्वांनाच कोरोनाने गिळंकृत केलंय. गेल्या १५ दिवसांत पुण्यातील जाधव कुटुंबातील पाचही जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जातेय.
जाधव कुटुंबात काही दिवसांपूर्वी एक पूजा झाली. या पूजेनिमित्त घरातील सर्वजण एकत्र आले होते. या पूजेनंतर त्यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला. एकामागोमाग एकाला कोरोनाची लाग होत परिस्थिती बिकट बनत गेली. गेल्या १५ दिवसांत त्यांच्या घरातील साऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अलका जाधव, रोहित जाधव, अतुल जाधव आणि वैशाली गायकवाड अशी मृतांची नावे आहेत.