Uncategorized

मुख्यमंत्र्यांची ४० आमदारांसह आज दिल्लीवारी; केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणार

मुख्यमंत्र्यांची ४० आमदारांसह आज दिल्लीवारी; केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणार

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यात सत्ता स्थापनेनंतर केलेल्या दिल्लीवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधक लक्ष्य करत आहेत. मात्र, यावेळी ते ४० आमदारांनाही सोबत घेऊन जाणार असल्याचे समजते. राज्यातील रखडलेल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी ते काही केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच या दौऱ्यावेळी ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयातही जाणार असल्याचे समजते.

राज्यात सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कधी मंत्रिमंडळ विस्तारासाठी, तर कधी निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीवारी केली. मात्र, आता ते त्यांच्या गटातील आमदारांनाही दिल्लीला घेऊन जाणार असल्याचे कळते. त्यासाठी महाराष्ट्र सदनातील बँक्वेट हॉल आणि प्रेस कॉन्फरन्स हॉलचा दिवस राखून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कळते. राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी या दिल्ली दौऱ्यादरम्यान ते केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे समजते. यामध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि नितीन गडकरी यांचाही समावेश असल्याचे समजते.

‘… तर हे सरकार गंभीर’
‘वेदान्ता फॉक्सकॉनप्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंतही दिल्लीला जात आहेत. मात्र, ते एकटे जाऊन काय उपयोग होणार? मुख्यमंत्री गेल्याशिवाय काही मिळणार नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जेवढे दिल्ली ऐकते, तेवढे मुख्यमंत्री शिंदे यांचे ऐकेल का? त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे सोबत दिल्लीला गेले, तर हे सरकार गंभीर आहे असे मी समजतो’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांना सोबत घेऊन गेले नाही, तर त्यांना दिल्लीत भेटही मिळणार नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button