केंद्र सरकार हिंदूविरोधी- यशोमती ठाकूर
नंदुरबार |
केंद्राचे भाजप सरकार हे हिंदूविरोधी असून गंगेत वाहून गेलेले मृतदेह हे हिंदूंचे नव्हते का, असा प्रश्न करत राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी भगवा ही कोणा एका पक्षाची जहागीर नसल्याचे सांगितले. प्रदेश काँग्रेसच्या वतीने येथे रविवारी व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रम मंत्री ठाकूर आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात जिल्ह्य़ातील स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्र मात ठाकू र यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.
या कार्यक्र मानंतर ठाकू र यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आणि बालकल्याण विभागाची आढावा बैठक झाली. करोना काळात कुपोषित बालकांना सर्वाधिक त्रास झाला असून स्थलांतरित मजुरांच्या बालकांचा शोध घेण्यासाठी खास प्रणालीचा अवलंब केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. करोनाकाळातच कॅसद्वारे होणारी पद्धत बंद करून केंद्राने नवीन पद्धत आणल्याने मोठा अडसर निर्माण झाला आहे. ही सर्व प्रणाली इंग्रजीतून असल्याने विभागाचा मोठा वेळ हा अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करण्यात खर्च होत असल्याने जुनीच प्रणाली सुरू ठेवण्याची विनंती केंद्राला करण्यात आली असल्याचे ठाकू र यांनी सांगितले.
अंगणवाडी बांधकाम हे ग्रामपंचायत स्तरावर होत असल्याने हवी तशी गुणवत्ता मिळत नसल्याने राज्यातील सर्व अंगणवाडींचे बांधकाम हे राज्यस्तरावरूनच करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अंगणवाडीतून दिला जाणारा पोषण आहार हा व्यापारी आणि ठेकेदारांच्या पोषणासाठी नव्हे तर, तो कुपोषित बालकांच्या पोषणासाठी असल्याने याबाबत कोणी कुचराई केल्यास कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.