Budget 2020: केंद्र सरकारने हवेत घोषणा करणारा अर्थसंकल्प सादर केला : खासदार सुनील तटकरे
मुंबई | महाईन्यूज
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीयांना सुसह्य जीवनाचे स्वप्न दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प शनिवारी लोकसभेत सादर केला. तर अर्थव्यवस्थेतील मंदी दूर होऊन बाजारपेठेत मागणीला उभारी यावी यासाठी लोकांच्या व कंपन्यांच्या हाती अधिक पैसा येण्याच्या अनेक योजना जाहीर केल्याचा दावा भाजपने केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प ६.0९ लाख महसुली कोटी तुटीचा असून, वित्तीय तूट ७.९६ लाख कोटी रुपये आहे. मात्र केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे नुसता घोषणांचा पाऊस, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी केलेली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा नाही. गेल्या अर्थसंकल्पामध्येही नुसता घोषणांचा पाऊस पाडला होता. आताही तेच काम या सरकारने केले आहे. शेतीचे उत्पन दुप्पट करण्याचे त्यांनी आधी सांगितले होते. त्याचे काय झाले, असा प्रश्न खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित केला आहे.