breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Budget 2019 Live: याच वर्षी अर्थव्यवस्था होणार तीन लाख कोटी रूपयांची

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात झाली आहे. या अर्थसंकल्पात काय काय तरतुदी असणार? शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या जाणार?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही वेळापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय काय तरतुदी असणार? करदात्यांना काय काय सवलती दिल्या जाणार? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

टॅक्स स्लॅबमची मर्यादा वाढणार का? सवलत मिळणार का? या सगळ्या गोष्टीही आज स्पष्ट होतील. सकाळी ११ वाजता निर्मला सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात केली. गुरूवारी जो आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला त्यामध्ये मोदी सरकारने अर्थव्यवस्थेसंदर्भातली सरकारची दिशा आणि धोरण स्पष्ट केलं आहे

११ वाजताचीच वेळ का?

ब्रिटिशांच्या काळापासून संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा होती. मात्र २००१ मध्ये यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलून ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची नवी परंपरा सुरू केली. त्यावेळी देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button