Breaking-newsराष्ट्रिय
वऱ्हाडाची कार तलावात कोसळून सहा चिमुरड्यांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/accident-15.jpg)
पाटणा : वऱ्हाडाची कार तलावात कोसळून बिहारमध्ये सहा चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झाडावर आपटून गाडी तलावात पडली.
कुर्साकाटामधील चिकनी गावात लग्न समारंभ आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांची कार डोरिया गावी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर आंबे तोडणाऱ्या लहान मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाडावर आपटून गाडी तलावात कोसळली.
अपघातात गाडीत असलेल्या दहापैकी सहा बालकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात ते चौदा वर्ष वयोगटातील चिमुरड्यांचा समावेश आहे. लहानग्यांचे मृतदेह पाहून त्यांच्या पालकांनी एकच आक्रोश केला. चौघा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.