breaking-newsराष्ट्रिय

मिझोरामच्या राज्यपालांनी लॉकडाऊनमध्ये लिहिली १३ पुस्तकं

नवी दिल्ली : राज्यपाल हे राज्यातील सर्वोच्च पद असत. त्यामुळे राज्यातील सांस्कृतिक, समाजकारणापासून राजकारणापर्यंतच्या सर्वच क्षेत्र त्यांच्या जवळून परिचयाची असतात. राज्यात अडचणीच्या प्रसंगात असताना राज्यपालांच्या दालनात धाव घ्यावी लागते. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वांचेच वेळापत्रक बदललंय. अशा स्थितीत मिझोरामचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी वेळ काढत स्वत:चा आदर्श देशासमोर ठेवलाय. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या काळात त्यांनी १३ पुस्तकं लिहून काढलीयत.

आपल्याकडे असलेल्या रिकामी वेळाचा सदुपयोग त्यांनी पुस्तकं लिहिण्यासाठी केलायं. मार्चपासून आतापर्यंत त्यांनी इंग्रजी तसेच मल्याळम भाषांमध्ये कवितासंग्रह देखील लिहिले.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राजभवनात कोणाला यायला परवानगी नव्हती. लोकांशी माझा थेट संबंध येत नव्हता. तसेच माझा प्रवास दौरा देखील काही काळासाठी रद्द करण्यात आला होता. यामुळे त्यांना पुस्तकं वाचन आणि लिखाणासाठी वेळ मिळाल्याचे ते सांहतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button