breaking-newsराष्ट्रिय
काँग्रेसने जनतेला मुर्ख बनवले आहे – नरेंद्र मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/modi-.jpg)
बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आक्रमक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमाकुरू येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून ‘गरीब, गरीब, गरीब’ करत आहे पण त्यांना गरीबांसाठी काहीही करता आलेले नाही. काँग्रेस पक्ष भारतातील गरीबांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या काळापासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरीबांना मुर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोट बोलत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची किंवा गरीबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत असे मोदी म्हणाले.