‘विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत’; ठाकरे गटातील नेत्याची राहुल नार्वेकरांवर टीका
मुंबई : शिवसेनेतील सत्तासंघर्ष आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर, न्यायालयाने संबंधित निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घ्यावा, असा निकाल दिला होता. मात्र अद्याप १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान, यावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.
भास्कर जाधव म्हणाले, आमचे वकील देवदत्त कामत होते. त्यांनी बाऊन्सर टाकला आणि विधानसभा अध्यक्षांना सांगितलं की, तुम्ही जो निर्णय द्याल, तो निर्णय आमच्यावर न्याय करणारा असेल किंवा अन्याय करणारा असेल. तो निर्णय खरा असेल किंवा खोटा असेल.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये संघटन मजबूत करा; शहराचे प्रश्न सोडवा!
निर्णय काहीही असला तरी आम्ही पुन्हा तुमच्याकडे पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही. पण तुम्ही काहीतरी निर्णय द्या. तुम्ही कुठलाच निर्णय देत नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. यामुळे विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत, हे स्पष्ट झालं, असंही भास्कर जाधव म्हणाले.