breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

शिंदे-फडणवीस सरकाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? बच्चू कडूंनी सांगितली थेट तारीख

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल लागला आहे. महिन्याभरापासून राखून ठेवलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालाने शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आहे. या निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक विधान केलं आहे.

बच्चू कडू म्हणाले की, राज्यात विकास कामं करायची असतील तर मंत्रिमंडळ विस्तार होणं आवश्यक आहे. ज्याला कुणाला मंत्री करायचं असेल त्याला करा, पण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा.

हेही वाचा – ‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल गोंधळात टाकणारा’; राज ठाकरेंची प्रतिक्रिया

राज्याला व्यापक पद्धतीने मंत्रिमडळाची गरज आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घ्यावा. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार २१ ते २६ मेपर्यंत होईल, असं सूचक विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button