‘सरकार म्हणून माझी भूमिका संपली, आता आंदोलक म्हणून..’; बच्चू कडूंचं सूचक विधान
मुंबई | मनोज जरांगे-पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. जरांगे पाटलांसह हजारो मराठा आंदोलक पायी यात्रेत सहभागी झाले आहेत. यावरून प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार म्हणून माझी भूमिका संपली आहे. आता आंदोलक म्हणून जरांगे-पाटलांच्या पायी मोर्चात सहभागी होणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले, मनोज जरांगे-पाटलांनी सांगितल्यानुसार सगे-सोयऱ्याच्या दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. सरकारनं दुरूस्त्यांवर सहमती दर्शवली आहे. सगे-सोयऱ्याचा प्रश्न मिटल्याचं जरांगे-पाटलांनी सांगितलं आहे. त्यामुळे सरकार निर्दयी झालं, असं म्हणता येणार नाही.
हेही वाचा – रामलल्लाच्या मूर्तीचा तो फोटो खरा नाही; मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले..
५४ लाख कुणबी नोंदी आढळल्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी भूमिका जरांगे-पाटलांनी मांडली आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला यश मिळावं आणि समाजाचं भलं होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
समाजाचं भलं होण्याची भूमिका जरांगे-पाटलांनी घेतली आहे. मराठा आरक्षणाची धोरणात्मक लढाई जरांगे-पाटलांच्या आंदोलनामुळे जिंकली आहे. सगे-सोयरेच्याबाबत सांगितलेले फेरबदल सरकारनं मान्य केले आहेत. आता फक्त नोंदी सापडलेल्यांना जातीचा दाखला मिळाला पाहिजे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.