ताज्या घडामोडीपुणे

मशिदीत अजान सुरू आणि गृहमंत्र्यांनी भाषण थांबवले

शिरुर, पुणे  | राज्यात मशिदींवरील सुरु असलेल्या वादामुळे जातीय तेड निर्माण होत असताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक जातीय समानतेचा संदेश दिला आहे. शिरुर तालुक्यातील मलठण येथील जाहीर कार्यक्रमादरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी एक जातीय संदेश दिला आहे. शिरुर तालुक्यातील मलठण येथील जाहीर कार्यक्रमादरम्यान दिलीप वळसे पाटलांचे भाषण सुरु असताना याचवेळी मशिदीवर आजान सुरु झाली आणि त्यांनी भाषण थांबवले.

याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणत्याही धर्माचा आदर करणे ही माझी पद्धत आहे. पण सध्या देशाच्या विकासावर बोलायचे सोडून मशिदींवरील अजानला विरोध केला जातो. हनुमान चालिसावर बोलायचे आणि धर्माधर्मात वाद निर्माण करुन राजकराण अस्थिर करण्याचे काम सध्या राज्यात सुरु आहे. यामुळे राजकारण अस्थिर होणार नाही, पण देश खिळखिळा होवून देशाचे तुकडे यातून पडू शकतात, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळायल्या हव्या. अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालीसा लावायची आहे त्यांनीही जरुर लावावी पण तिकडे अजान होत असते त्याचवेळी लावू नये. तसेच अजानचा भोंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही, असंही दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले होते ?

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, मात्र राज्यातील मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल, असं राज ठाकरे म्हणाले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button